जिणे आखीव भूमीतीप्रमाणे
कटाक्षांचे जरी जाळे मुलायम
चिवटता तांबड्या फीतीप्रमाणे
लढाईचे नियम आधीच ठरवू
करू संसार रणनीतीप्रमाणे
दुधाची भागवू ताकावरी, ये
तृषेला भोगही प्रीतीप्रमाणे
दिसो तृप्ती मुखावर पूर्ततेची
असावी क्लांतता वीतीप्रमाणे
हवा ठेहराव कवितेला भिनाया
भिडाया चाल मृगगीतीप्रमाणे
Labels: ghazal, Marathi ghazal, गझल, मराठी गझल
जिणे आखीव भूमीतीप्रमाणे
कटाक्षांचे जरी जाळे मुलायम
चिवटता तांबड्या फीतीप्रमाणे
लढाईचे नियम आधीच ठरवू
करू संसार रणनीतीप्रमाणे
दुधाची भागवू ताकावरी, ये
तृषेला भोगही प्रीतीप्रमाणे
दिसो तृप्ती मुखावर पूर्ततेची
असावी क्लांतता वीतीप्रमाणे
हवा ठेहराव कवितेला भिनाया
भिडाया चाल खगगीतीप्रमाणे
Labels: ghazal, Marathi ghazal, गझल, मराठी गझल
कल्पना झाल्या शिळ्या, प्रतिमा पुराण्या
0 comments Posted by Milind Phanse at Wednesday, April 01, 2015झाडते आहे तरी कविता दुगाण्या
भेटतो तो आपल्या दु:खात असतो
ऐकवाव्या मी कुणाला रडकहाण्या
कूस केव्हा बदलली ह्या जीवनाने?
युगुलगीतांच्या कधी झाल्या विराण्या?
युद्धभूमी पाहुनी अवसान गळले
अन् तुतार्या कालच्या झाल्या पिपाण्या
हे किती शोकांतिकांचे मूळ असते
एक राजा आणि त्याच्या दोन राण्या
Labels: ghazal, Marathi ghazal, गझल, मराठी गझल
तिच्या रूपात जेव्हा मोह अवतरला
तिची वर्दी मला देताच डोळ्यांनी
फुलांचा गालिचा हृदयात अंथरला
इथे नाचीत तालावर तिच्या सारे
तिथे दरबार इंद्राचा सुना पडला
जसे घोंघावते वारे उरी भरले
तसा पदराबरोबर तोल ढासळला
स्वत:वर ठेवता आला न मज ताबा
तिचाही पाय थोडा वाकडा पडला
दिवे मिष्किल उजळले नेमक्या वेळी
तिने अंगावरी संकोच पांघरला
Labels: ghazal, Marathi ghazal, गझल, मराठी गझल
तिला पाहण्याचा लळा लागला
स्वत:हून मासा गळा लागला
नव्हाळीत नाहून शृंगारली
किती देखणा सापळा लागला
नको गर्व, राधे, उजळ कांतिचा
तुलाही निळासावळा लागला
मनाला मृदुल स्पर्श झाला तिचा
झरा प्रीतिचा कातळा लागला
उभय चेहर्यांवर प्रभा तृप्तिची
भुकेला तनय आचळा लागला
युगुलगीत आपण जरी छेडले
तुझा सूर का वेगळा लागला?
उसळती नदी मी, निमाले, मिलिंद
तुझा पाय यमुनाजळा लागला
Labels: ghazal, Marathi ghazal, गझल, मराठी गझल
कोण स्वत:चा असतो? सारे गुलाम संबंधांचे
0 comments Posted by Milind Phanse at Friday, December 26, 2014ब्रह्म स्वयंभू, बाकी येथे तमाम संबंधांचे
कूस सवाष्णेची, पण दिसते कपाळ वैधव्याचे
पोर निरागस असुनी ठरते हराम संबंधांचे
रोग दुराव्याचा दोघांच्या मनास जडला असता
दु:खद नात्यावर चोपडतात बाम संबंधांचे
लाभ सहज होतो ज्याचा ते सहज विसरले जाते
मोल करी ना कोणी हल्ली छदाम संबंधांचे
थेट अनादी कालापासून सामने चुरशीचे
स्त्री-पुरुषांच्या मेळाचे, साम-दाम संबंधांचे
यौवन येता वात्सल्याचे, जरेत मग गात्रांचे
'भृंग', जगी चुकले कोणाला विराम संबंधांचे?
Labels: ghazal, Marathi ghazal, गझल, मराठी गझल
आधी थोडी गर्दी जमते, गर्दीचा मग जमाव होतो
0 comments Posted by Milind Phanse at Friday, August 01, 2014आधी थोडी गर्दी जमते, गर्दीचा मग जमाव होतो
दंगे-धोपे होता होता एके दिवशी उठाव होतो
नारेबाजी, राडेबाजी, मारामार्या, अंदाधुंदी
जिथे पहावे तिथे क्रांतिचा अखेर हा स्थायिभाव होतो
लढो महात्मे शस्त्रावाचुन, लढो शस्त्रपुत क्रांतीकारी
लढ्यात दोन्ही सामान्यांचा अटळपणे रक्तस्राव होतो
आयोगांवर आयोगांचा रतीब शासन घालत बसते
सभात्याग अन् घोषणांत मग दुर्लक्षाचा ठराव होतो
रोज बातम्या पाहत पाहत हळवेपणही लयास जाते
खून, दरोडे, बळजबरीचाही डोळ्यांना सराव होतो
Labels: ghazal, Marathi ghazal, गझल, मराठी गझल
मौनात बाकी पोचवू, नि:शब्द हो, कविते
केलीस तितकी खूप आहे वाट दु:खांना
वाहून जाऊ देत पू, नि:शब्द हो, कविते
हा अक्षरांचा गोफ केवळ कागदी आहे
ना गंध त्याला, ना मधू, नि:शब्द हो, कविते
होईल सवयीचा पलायनवाद श्रोत्यांना
होईल शब्दांची अफू, नि:शब्द हो, कविते
बोलूनही काही बदलणे ज्यांस ना जमते
त्यांचे जगी होते हसू, नि:शब्द हो, कविते
सेवायला बागेत नाही 'भृंग' कोणीही
वाया नको ग मोहरू, नि:शब्द हो, कविते
Labels: ghazal, Marathi ghazal, गझल, मराठी गझल
फुलतो गुलाब गाली, पडते खळी अशाने
याचक बनून आलो, वर्षाव कर स्मितांचा
भरतील मौक्तिकांनी ह्या ओंजळी अशाने
सुकवीत केस ओले सौधात का उभी तू?
निर्दोष माणसांचा जातो बळी अशाने
रंगात श्रीहरीच्या रंगू नकोस इतकी
होशील, गौर राधे, तू सावळी अशाने
समईपरी उशाशी तेवीत दोन डोळे
प्रत्येक रात्र होते दीपावळी अशाने
संदेश पाठवावे, विरही मना, कितीदा?
होईल दूत सारी मेघावळी अशाने
तिज धुंद सांजकाळी चिडवू नकोस 'भृंगा'
एकादशी घडो ना तुज निर्जळी अशाने
Labels: ghazal, Marathi ghazal, गझल, मराठी गझल
रणधुमाळी तीच अन् त्याच आरोळ्या पुन्हा
0 comments Posted by Milind Phanse at Tuesday, April 15, 2014ठाकल्या समरांगणी लुटुपुटू टोळ्या पुन्हा
लाख लाखोल्या जरी एकमेका वाहिल्या
गाठण्या सत्ताशिखर बांधती मोळ्या पुन्हा
धूळ ज्यांची मस्तकी धारली ते मातले
घालवत नाही, मना, स्वप्नरांगोळ्या पुन्हा
राजकारण खेळ हा कुंटणींचा चालला
पुनरपी ढळले पदर, उतरल्या चोळ्या पुन्हा
मोठमोठे मार्ग पण वाटमारी टोलची
रे खिशा, वाटा बर्या त्याच चिंचोळ्या पुन्हा
दीन-दुबळे गांजले; आग पोटी पेटली
भाजती नेते, पहा, त्यावरी पोळ्या पुन्हा
नेहमी आश्वासनी अडकतो अलगद अम्ही
आपला देती बळी मक्षिका कोळ्या पुन्हा
कैफ धर्माचा नुरे, ना निधर्माची नशा
ह्यापुढे आणू नका त्या अफूगोळ्या पुन्हा
पाच वर्षे पोटभर खूप लोणी लाटले
जोगव्यासाठी पुढे, 'भृंग', का झोळ्या पुन्हा?
Labels: ghazal, Marathi ghazal, गझल, मराठी गझल
शब्द धन ज्याचे, खरा श्रीमंत आहे
लोक का भीतात एकाकीपणाला
कोण कोणाचा इथे आद्यंत आहे?
मी तिला ठरवूनही सोडू न शकलो
मी कुठे श्रीराम वा दुष्यंत आहे?
राजकारण खेळ आहे लेबलांचा
कालचा डावा अता सामंत आहे
पक्षही ओवाळला आहे तुझ्यावर
सांग, खुर्चे, कोण निष्ठावंत आहे?
उभयतांचा कोंडमारा होत आहे
अप्सरेच्या सोबतीला संत आहे
गाठ मरणाशी, स्मशानाशीच कायम
भूत ना वेताळ, तो किरवंत आहे
काय चुकले, पूजले जर मी स्वत:ला
'भृंग', सर्वांच्यात जर भगवंत आहे?
Labels: ghazal, Marathi ghazal, गझल, मराठी गझल
दारू, सत्ता, पैसा, नारी; ध्येय वेगवेगळे
0 comments Posted by Milind Phanse at Saturday, December 21, 2013नशा तीच, पण प्रत्येकाचे पेय वेगवेगळे
एक जरी हा प्रवास आणिक अंत एक सर्वांचा
वेगवेगळी ओझी अन् पाथेय वेगवेगळे
स्तन्याचे, वात्सल्याचे, प्रीतीचे, कर्तव्याचे
आयुष्याच्या हर टप्प्याचे देय वेगवेगळे
मोळी बांधा, साकल्याने अर्थ लावता येतो
शब्द एरवी कवितेचे अज्ञेय वेगवेगळे
अस्थैर्याची, चंचलतेची चर्चा जेव्हा होते
'भृंग' मूर्त उपमान एक, उपमेय वेगवेगळे
Labels: ghazal, Marathi ghazal, गझल, मराठी गझल
नररुंड मोजताहे निर्जीव लोकशाही
कुरणात हिरवळीचा ना मागमूस काही
जितका मनुष्य चरतो, चरतील काय गाई?
युद्धात जीवनाच्या इतकीच फक्त ग्वाही
राजे खुशाल; पडती मृत्यूमुखी शिपाई
लागेल फोडणीला तितकाच हातभारऽ
आश्वासनांत डोंगर अन् पूर्ततेत राई
वाढीव किंमतींनी कंठास प्राण आले
सगळेच तंग झाले, उसवू कुठे शिलाई
गेला खिशात केव्हा पाठीवरील तो कर?
मी पाहतो अचंबित ही हातची सफाई
निवडून कोण आले हा प्रश्न व्यर्थ आहे
बदलेल काय त्याने हा प्रश्न मर्मग्राही
डावे वळण असो की उजवीकडील रस्ता
देशोधडीस नेती आम्हा दिशा दहाही
हे रोमराज्य चालो की 'राम'राज्य येवो
पण पाचवीस अमुच्या पुजल्येय मोगलाई
Labels: ghazal, Marathi ghazal, गझल, मराठी गझल
काव्य दुखर्या अंतरीचे दूत होते
शब्द होते, अर्थ होते, द्वैत होते
का असे तुकड्यात माझे गीत होते?
प्राक्तनाने मी कवी झालो असावा
भाग्य उदयाला खरे तर नेत होते
कूस कवितेची कशी उजणार, सांगा ?
क्षेत्र वांझोटे, नपुंसक रेत होते
राहिले सांगावयाचे ते तळाशी
पृष्ठभागी काव्यसदृश प्रेत होते
जे लिहू, मानेवरी येऊन बसते
वर्तमानाचे अखेरी भूत होते
कोण, कुठला तू, स्वत:ला पूस 'कोहम्'
वेद रचणारे कवी अज्ञात होते
Labels: ghazal, Marathi ghazal, कविता, गझल, मराठी गझल
कधी मेनकांनी तपोभंग केले
गुरू तेच अध्यात्ममार्गावरीचे
सग्यासोयर्यांनीच नि:संग केले
मना मोह होता सदोदीत श्रीचा
मुखे नित्य "श्रीरंग, श्रीरंग" केले
दगड तो, नका त्यास शेंदूर फासू
अशानेच नाच्यास नटरंग केले
कशाला, सखे, मंदिरी जाग्रणे ती?
तुझ्या बाहुपाशात सत्संग केले
पहा दूर सारून हा शब्दपडदा
मनाचे उघड अंग-प्रत्यंग केले
Labels: ghazal, Marathi ghazal, गझल, मराठी गझल
चुरगाळल्या शब्दात कविता शोधतो
टीपांत अन् कंसात कविता शोधतो
अर्थास शैलीदार फाशी देउनी
शृंगारल्या प्रेतात कविता शोधतो
होते कुठे, जग चालले आहे कुठे
मी आपला परसात कविता शोधतो
येता गझल होऊन यौवन लाजरे
अरसिक पहा, ग्रंथात कविता शोधतो
धुंदी कमी, जितके अधिक फेसाळणे
मी घोटभर निर्वात कविता शोधतो
पुसतात ज्यांनी झोकली नाही कधी
"हा कोणत्या कैफात कविता शोधतो?"
संसार, पेशा, प्रकृतीचे तापत्रय
देऊन त्यांना मात कविता शोधतो
केव्हातरी गवसेल, थोडा वेळ दे
पसरून लिहिते हात कविता शोधतो
होता रिते साहित्य, रमणी अन् चषक
निर्गुण निराकारात कविता शोधतो
Labels: ghazal, Marathi ghazal, कविता, गझल, मराठी गझल
मातली काळोखसत्ता, सूर्य सारे अस्त झाले
हिंद देशा; चोर, डाकू, ठग तुझे विश्वस्त झाले
भूक म्हणजे काय असते भारतीयांना समजले
ह्या इथे गाई-गुरांचे खाद्य देखिल फस्त झाले
देशसेवा, तत्त्व, निष्ठा, त्याग, संयम, प्रेम, शांती
ह्या महागाईत, बाकी, शब्द तितके स्वस्त झाले
बातम्या देण्यात रस उरला कुठे वार्ताहरांना?
ते दलालीवर नट्यांचे रोकडे मध्यस्त झाले
केस सीबीआयच्या हाती दिली न्यायाधिशांनी
"हुश्श"! मंत्री आणि बाबू पूर्णत: आश्वस्त झाले
बैसती बांधून डोळे सिंह ते सिंहासनावर
एक पायावर उभे बगळे जणू संन्यस्त झाले
Labels: ghazal, Marathi ghazal, गझल, मराठी गझल
चतुर्भुज होउनी आपापले अंगण मिळाले
कुणा घरपण मिळाले, तर कुणाला रण मिळाले
कशाला सोहळ्यांसाठी फुका पंचांग बघता?
करावे साजरे जे जे सुखाचे क्षण मिळाले
रिता पेला कधी दिसला न मधुबालेस माझा
भले नंतर तिच्या डोळ्यांतुनी तर्पण मिळाले
जरा उघडून डोळे माणसांना पाहिल्यावर
कधी प्राणी, कधी दानव, कधी सुरगण मिळाले
किनार्यावर जरी चालून गेल्या लाख लाटा
चढाईतून त्यांना फक्त वाळूकण मिळाले
निवडणुक पार पडली, लोकशाही तृप्त झाली
दरिद्र्यांना नवे नवकोट नारायण मिळाले
कवच बेकायद्याचे सत्यही भेदू न शकले
खुन्याला फौजदाराचेच संरक्षण मिळाले
तसा वर्षाव सर्वांच्या शिरी केला जगाने
कुणाला पाकळ्या कोमल, कुणाला घण मिळाले
निघाला 'भृंग' कवितेने समाजाला बदलण्या
बदलले हेच, बैलांना नवे वैरण मिळाले
Labels: ghazal, Marathi ghazal, गज़ल, गझल, मराठी गझल
पण पाप मात्र माझे ठरवील चित्रगुप्त
गीते, तुझी कशाला पारायणे करावी?
निष्काम कर्मयोगी राही जगात भुक्त
सांगो हरी कितीही स्थितप्रज्ञलक्षणे पण
रक्तात मोह आदिम धर्माहुनी सशक्त
धर्मात आणि स्वर्गी आत्म्यास मान आहे
मातीविना कुणाला काया हवी निरस्त?
ओवाळताय कसल्या लोकां, सुवासिनींनो?
देशात काजव्यांच्या काळोख औक्षवन्त
निजतात जे फुलांच्या बाहूत 'भृंग' कायम
मधुरात्र संपल्यावर करतील, "हन्त, हन्त"
Labels: ghazal, Marathi ghazal, गझल, मराठी गझल
लागता लोक बोलू खरे
ओघळू लागले चेहरे
ते अधोमुख; नयन लाजरे
ते मुखवटेच होते, बरे
लोकशाहीत देती पहा
खाटकांना मते कोकरे
हा मयत खास होता धनिक
खूप जमले सखे-सोयरे
पापकर्मे अथक कार्यरत
का घडा ना कुणाचा भरे?
मन करपते तहानेमुळे
शुष्क संवेदनांचे झरे
झाकली मूठ तोट्यातली
कोण हल्ली पदर सावरे?
बोलतो फार विक्षिप्त मी
जो न बोले, शहाणा ठरे
Labels: ghazal, Marathi ghazal, गझल, मराठी गझल