Blogger Template by Blogcrowds

Friday, May 09, 2008

गझल

ना कुणी कल्याणकर्ते शेष आता
राज्यकर्ते लांडगे वा मेष आता

शेत सुकले, कर्ज थकले, मॉल सजले
केव्हढा बदलून गेला देश आता

बैल जो बसला, पुन्हा उठलाच नाही
वैरणीचा राहिला ना लेश आता

आदिवासींनो, नका राहू उपाशी
शासनाने काढला आदेश आता

एकही नाही कुपोषित मूल येथे
पोटभर मिळतात अध्यादेश आता

राहिली लोकांस ना ऊर्मी लढ्याची
राहिला नाही जुना आवेश आता

नाग बसले व्यापुनी सहकारयमुना
कालिया सारे, कुणी ना शेष आता

सांगली, बारामती, लातूर, करविर
यापुढे उरला नसे का देश आता ?

1 comments:

गजलला दाद द्यावी म्हटले तर तीने अंतर्मुख करायला लावले

9:41 AM  

Newer Post Older Post Home