किती शब्द गिरवून पाहिले, परंतु कोरी पाटी
बोटे झिजली, मीही झिजलो; कशास ? कोणासाठी ?
घडण मनाची एकलकोंडी, हृदयी भावविवशता
एकरूप कवितेशी करते, उपरा लोकांसाठी
अनुभूतीचे असे दंश की सर्पांनी लाजावे
रक्त कमी, धमन्यांतून झाली हलाहलाची दाटी
कटूपणाला पिळवटून ये कटूच रसनिष्पत्ती
कसा गोडवा यावा शब्दांतून पेरण्यासाठी ?
मनातल्या गाळाचा निचरा कवितेमधुनी केला
भागिरथीसाठी कवनाच्या किती उपसली माती
किती समीधा ओळींच्या अर्पून पेटता ठेवू ?
हविर्भाग जगण्याचा देतो लेखनयज्ञासाठी...
Labels: कविता
1 Comment:
-
- क्रांति said...
5/11/09 7:48 pmsurekh! khoop aavadali kavita.
Subscribe to:
Post Comments (Atom)