विझल्या कालांतराने पोरक्या मशाली
कालचा कार्यकर्ता पुन्हा बने मवाली
विरल्या हवेत फ़सव्या घोषणा कधीच्या
पुनश्च लोक आता ईश्वराच्या हवाली
ल्यालें राजवस्त्रें ते गावगुंड सारे
जनता- जनार्दनाला ही लक्तरें मिळाली
उजवें अथवा डावें , भगवें वा निधर्मी
कोणी पुसें न आता दीनांची खुशाली
आपापल्या दु:खाचा वाहतो भार जो तो
चुकली कुणास येथे ही रोजची हमाली
Labels: कविता
1 Comment:
-
- Nandan said...
8/1/07 5:22 amkavita aavadali, milind. naveen varshachya anek shubhechchhaa.
Subscribe to:
Post Comments (Atom)