लागता लोक बोलू खरे
ओघळू लागले चेहरे
ते अधोमुख; नयन लाजरे
ते मुखवटेच होते, बरे
लोकशाहीत देती पहा
खाटकांना मते कोकरे
हा मयत खास होता धनिक
खूप जमले सखे-सोयरे
पापकर्मे अथक कार्यरत
का घडा ना कुणाचा भरे?
मन करपते तहानेमुळे
शुष्क संवेदनांचे झरे
झाकली मूठ तोट्यातली
कोण हल्ली पदर सावरे?
बोलतो फार विक्षिप्त मी
जो न बोले, शहाणा ठरे
Labels: ghazal, Marathi ghazal, गझल, मराठी गझल
0 Comments:
Subscribe to:
Post Comments (Atom)