हे अबोलीला कधी कळणार नाही
घाव मौनाचा कधी भरणार नाही
का असे फटकून वागावे फुलांनी?
हा ऋतू, हा बहरही ठरणार नाही
तू मला अन् मी तुला आहोत अंती
राग-रुसवा जन्मभर पुरणार नाही
भार दु:खाचा नको देऊस इतका
पापणी झुकुनी पुन्हा उठणार नाही
हुंदक्यांची मालिका चालेल अविरत
जोवरी अधरा अधर भिडणार नाही
Labels: ghazal, Marathi ghazal, गझल, मराठी गझल
0 Comments:
Subscribe to:
Post Comments (Atom)