Blogger Template by Blogcrowds.

ऋतू येत होते, ऋतू जात होते
बहरणे फुलांचे दिमाखात होते

कुणी स्पर्श केला कळीला न कळले
उमलणेच केवळ तिला ज्ञात होते

अधोमुख असे ती कधी लाजुनी अन्
कधी बाण तिरप्या कटाक्षात होते

तिच्या आठवांचे कफन पांघरुनी
किती प्रेमवेडे सती जात होते

गुन्हेगार नाही, सखे, एकटा मी
नयन तव शराबी प्रमादात होते


गजलेची जमीन वैभव जोशी ह्यांच्या सौजन्याने

0 Comments:

Post a Comment



Newer Post Older Post Home